Posts

Special Cafe !

 आज सिकंदराबाद मधल्या Deaf Enabled Foundation या संस्थेत कामानिमित्त गेले होते. ऐकू न येणाऱ्या आणि बोलता न येणाऱ्या लोकांसाठी ही संस्था काम करते हे संस्थेच्या नावातून समजतंच. विशेष म्हणजे जिथे आमचं काम चालतं तिथे  काम करणारे, हा उपक्रम चालवणारे सगळे ऐकू आणि बोलू न शकणारे आहेत. संस्थेचे अकाउंट्स सांभाळणारी मुलगी आणि समन्वयक दोघंच असे होते जे ऐकू बोलू शकत होते पण Indian Sign Language मधूनही ते उत्तम प्रकारे व्यक्त होत होते. सगळं काम सुरळीत आणि शांततेत सुरू होतं. मी साधारण तिथे दोन एक तास होते. काम करत होते आणि सोबतच आजूबाजूला न्याहाळत होते. कधी कधी आपल्याकडं सगळं आहे हे आपण किती गृहीत धरतो ? मध्यंतरी लॉकडाऊन च्या काळात Indian Sign Language चा छोटा कोर्स मी केला. त्याचा आज फायदा झाला. पूर्वी अश्या संस्थेत गेल्यावर सगळ्यांशी बोलताना interpreter शिवाय जमायचं नाही . पण आज मोडक्या तोडक्या का होईना पण Indian Sign Language मधून मला सगळ्यांशी संवाद साधता आला. ते काय बोलत होते तेही मला नीट समजत होतं. कुठल्याही मध्यस्थाशिवाय मला त्यांच्याशी बोलता येत होतं.  आपण जेव्हा वेगळ्या प्रांता...

अनोखी भ्रमंती पुण्या जवळची

 पुण्याजवळ अशी अनेक  ठिकाणं आहेत जी एका दिवसात बघून होतात.त्यातलीच काही ठिकाणं बघण्याचं आज ठरवलं.मी शाळेत असताना ,बहुधा आठवी नववीत असताना, आमची शैक्षणिक सहल ज्या ठिकाणी गेली होती तीच सफर आज ऋचा सोबत करावी असं वाटलं. गेली दोन वर्ष शाळाच बंद असल्यानं educational excursion वगैरे होणं अवघडच. म्हणून मुद्दाम भूगोलाच्या पुस्तकातल्या गोष्टी प्रत्यक्ष बघायला गेलो. तर पाहिलं ठिकाण होतं निघोज आणि या गावातले कुकडी नदीत नैसर्गिक रीत्या तयार झालेले रांजणखळगे अर्थात Volanic rock cut pots. अहमदनगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यात हे गाव आहे. पाण्याच्या खळाळत्या प्रवाहामुळे रांजणाच्या आकारासारखे खोल असे तयार झालेले हे खळगे बघण्यासारखे आहेत. पावसाळा सोडून कधीही इथे हे रांजणखळगे नीट बघता येतात. रांजणखळगे नीट बघता यावे यासाठी एक gallery बांधली आहेच. शिवाय एक जुना झुलता पूल पण आहे.या पुलाच्या अलिकडे पुणे जिल्हा आणि पलीकडे नगर जिल्हा. मळगंगा देवीचं कुकडी नदीच्या काठावरचं मंदिर छान आहे आणि आज फारशी गर्दी नसल्याने संपूर्ण परिसर छान शांत होता. पण तरीही खंत वाटावी अशी एक गोष्ट बघायला मिळाली. ती म्हणजे काही र...

मेणवलीचा वाडा

 ॥ मेणवलीचा वाडा ॥ वाई हे ठिकाण मला नवीन नाही. हे आमचं मूळ गाव, त्यामुळे लहानपणीपासून इथं सतत येणं होतंच. वाईचं ग्रामदैवत म्हणजे धुंडीविनायक गणपती. हे  मंदीर शिवाजी महाराजांनी देखरेखीसाठी साबणे कुटुंबीयांकडे  सोपवलं आणि तेव्हापासून आजपर्यंत या मंदिराची व्यवस्था साबणे परिवार करतो. साबणे कुटुंबाचा भाग असल्याने गणेश जयंतीला उत्सवात येणं होतं आणि इतर वेळीही अनेकदा होतं. याशिवाय ढोल्या गणपती दर्शन, कृष्णा बाईचा उत्सव असताना तिचे दर्शन आणि जवळच असणारा मेणवलीचा घाट बघणे हे ठरलेलंच.त्याचप्रमाणे घाटाला लागून असणारा नाना फडणवीस वाडा देखील आधी बघितला होताच. शेंदूरजणे इथे असलेल्या Mapro ची भर यादीत नव्याने पडली  आहे.  पण काल जेव्हा पुन्हा एकदा मेणवली गाठलं तेव्हा मिळालेला अनोखा अनुभव आवर्जून सांगावा असाच आहे. नेहमीप्रमाणे आमच्या गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन मेणवलीच्या वाटेनं निघालो.नेहमीप्रमाणे अर्धवर्तुळाकार सुदंर घाट बघायचा. मेणवलेश्र्वराचं मंदीर दर्शन, पोर्तुगीज मोठी घंटा बघायची आणि साधारण अर्ध्या तासात पुढील प्रवासाला निघायचं असं ठरवलं होतं. पुढे धोम धरण आणि नृसिंह मंदिर ...

मित्रो.... (पुण्याची ) मेट्रो

 मित्रो.... (पुण्याची ) मेट्रो कालच पुणेकरांची partial स्वप्नपूर्ती होऊन छोट्या route वर का होईना पण मेट्रो सुरू झाली. फर्स्ट डे फर्स्ट शो बघणं, सगळ्यात आधी म्हणजे इतर मंडळी तिथे जाऊन येण्याआधी आपण जाऊन यायलाच हवं, असा कधीच माझा हट्ट नसतो. आत्तापर्यंत असं काही कधीही जमवलं नाही आणि त्याच सोयरं ना सुतक.एवढं सगळं सांगतेय कारण अगदी पहिल्या दिवशी नाही पण दुसऱ्याच दिवशी पुण्याच्या मेट्रो मध्ये बसण्याची इच्छा झाली ( त्याला सोप्या भाषेत खाज म्हणता येईल) आणि केवळ इच्छा नाही तर इच्छापूर्ती करायला घरातून two wheeler काढून आम्ही गरवारे कॉलेज काढलं. आम्ही म्हणजे मी आणि नवरा. मुलीला फारसा इंटरेस्ट नव्हता. आधी अनेकदा मेट्रोत बसल्यामुळे असेल कदाचित. पण तसं तर आम्ही पण बसलोच होतो की पण अस्सल पुणेकर असल्याचं शाबूत करावं म्हणून हा खटाटोप.   नुकत्याच कोरोना संकटातून बाहेर पडल्यासारखं वाटतंय हे प्रत्येकानं लावलेल्या मास्क मुळे थोडं वाटत होतं एवढंच .पण बाकी pre COVID era असल्यासारखं सगळं वातावरण होतं. तिकीट काढायला पेशवे पार्क मध्ये फुलराणीला जशी गर्दी अगदी तशीच  होती आणि उत्साहही तेवढाच....

पळसधरी

 आज निमित्त ऑफिसच्या "team buidling activity" चं होतं. याआधी रिसॉर्ट किंवा तत्सम ठिकाणी जाऊन दिवस घालवणं हे ठरलेलं. पण आज एकत्र आलो ते एका सुरेख ठिकाणी. पुरखों की हवेली वगैरे. याला बंगला वगैरे म्हणण्यापेक्षा हवेलीच म्हणायला हवं इतका सुंदर हा वाडा. दिवाडकर कुटुंबाचा (कल्पना दिवाडकर आमच्या वरीष्ठ अधिकारी त्यांचा हा वाडा) हा वडिलोपार्जित वाडा. दिवाडकर कुटुंब मूळचं कर्जत जवळ पळसधरी इथलं आणि याच ठिकाणी हा वाडा आहे. कल्पना दिवाडकर यांचा पाहुणचार आज लाभला. पाहुणचार कसा असावा याचा उत्तम अनुभव मिळालाच पण त्यासोबत या वाड्याची ओळख झाली.  १९३०-३६ या काळात बांधलेला हा दगडी वाडा, अगदी आखीव रेखीव, अगदी बघताच क्षणी मनाचा ठाव घेतो. वाड्याच्या अवती भोवती आमराई आहे. शिवाय चिक्कू आणि फणसाची झाडं आहेत. वाड्यामागे मोठा तलाव आहे . आजूबाजूला नीरव शांतता आणि स्वच्छता. वाड्यात ज्यांनी हा वाडा बांधला त्यांचे फोटो आहेत, दिवाडकर कुटुंबाचा फोटो आहे. एका कोपऱ्यात या वाड्याचं सुरेख रेखाटन आहे. एक देवाघर असलेली खोली आणि पाच बाकी  प्रशस्त खोल्या आहेत. मोठ्ठा दिवाणखाना आणि मागच्या बाजूला लाकडी कठडा असणारा ...

कोकण ... परत परत

 चला कुठेतरी भटकून येऊ असं म्हणत परत एकदा कोकण गाठलं. कशेळी, कनकादीत्य मंदीर, गणेश गुळे , आरे वारे ,पूर्णगड, गणपतीपुळे असं एक दोन दिवस भटकत शेवटी गाडी उक्षी नावाचं ठिकाण शोधत निघाली. थिबा पॅलेस आणि रत्नदुर्ग बघून गर्दी मागे पडत गेली आणि गाडी एका सड्यावर पोहोचली. गूगल उक्षीचा रस्ता दाखवत असलं तरी नेमकी हवी ती जागा सापडत नव्हती. रस्त्यावर नावाची पाटी अगदी शोधून एखाद दुसरी. मग कोकणात पत्ता विचारायची जुनी पद्धत अमलात आणून कातळशिल्पाचं नेमकं ठिकाण शोधत गेलो. आणि एका वेगळ्याच कालखंडात आमची गाडी येऊन थांबली. आम्ही पाच जण सोडून दूर दूर पर्यंत माणूस दिसत नव्हता.  कोकणातल्या यावेळच्या भटकंतीचा अफलातून Finale आम्ही अनुभवत होतो. कोकणात काही वर्षापूर्वी जी काही कातळशिल्पं सापडली त्यापैकी दोन उक्षी परिसरात आहेत. आणि त्यातल्या एका कातळ शिल्पा जवळ आम्ही होतो. शिल्पाच्या बाजूने दगड रचून छान कुंपण केलं आहे. हा परिसर आणि शिल्पांचं नीट जतन व्हावं यासाठी प्रयत्न चालू आहेत याच्या खाणाखुणा दिसत होत्या. पण शिल्पाबद्दलची बाकी काही माहिती लिहिली नव्हती. आता आपण आपलं डोकं ,तर्कबुद्धी वापरून आणि कल्पनाशक...

वारी !

 अशी कुठली गोष्ट आहे जी शेकडो वर्षे वारकऱ्यांना पंढरपूरला पायी जाण्यासाठी प्रवृत्त करते ? पंढरीनाथाबद्दल अपार भक्ती, त्याला बघण्याची , तो असण्याचा अनुभव घेण्याची जबरदस्त आस, वारीला जाण्याची  वर्षानुवर्षांची घरची परंपरा, सदा सर्वकाळ असणाऱ्या सुख दुःखापासून काही काळ मनाने खूप लांब जायची मुभा , वर्षातून एकदा वारीतच ओळख झालेल्या मैत्राला भेटायची ओढ , की नुसतीच एक अचाट गोष्ट अनुभवण्याची मजा की अजून काही.  मला हा प्रश्न अनेक वर्ष पडायचा अजूनही पडतो. अशी काय विलक्षण गोष्ट आहे ज्यामुळे मैलानुमैलाची पायपीट त्रास न वाटता आनंदसोहळा वाटतो. ऊन ,पाऊस,वारा यांचा परिणाम क्षुल्लक वाटतो. आपापली गावं, घरं, माणसं सोडून  मुखी पांडुरंगाचं नाव घेत अनेक दिवस फक्त चालत राहायचं. तहान , भूक, विश्रांती, झोप, जुने आजार, दुखणी ,खुपणी या सगळ्या जाणीवा आहेतच पण त्याचा बाऊ न करता चालत राहायचं. यात बहुसंख्य मंडळी ही अनेक पावसाळे बघितलेली . अशी कोणती गोष्ट आहे जी सगळ्यांची पाऊले पंढरीच्या वाटेवर आणते.  त्यांच्यासोबत थोडी वाट चालून बघू मग कळेल असं वाटलं आणि आळंदी गाठली. सकाळी देवळात दर्शन घेऊन निघ...